
Mukhyamantri Solar Krushi Vahini Yojana:-
कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे क्रांतिकारी अभियान राज्य शासनाने ठरविले असून त्याबाबतचा महत्वपूर्ण राज्यसरकारने ऊर्जाविभागामार्फत घेतला आहे.
राज्यशासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्याचे धोरण ठरविले असून याद्वारे राज्यातील
शेतकरी बांधवांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा Electricity Supply करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेद्वारे राज्यात वीज निर्मितीसाठी रुपये ३०,००० कोटींची गुंतवणूक Investment अपेक्षित असून यामुळे ग्रामीण भागात सुमारे १९,००० रोजगार निर्मिती, ग्रामीण विकासाला हातभार लागणार आहे.
या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्राधान्यक्रमाने शासकीय आणि खाजगी जमिनीचा Government And Private Land वापर केला जाणार असून, शेतकरी बांधवांना त्यांची पडीक जमीन भाड्याने देऊन नियमित उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी मिळणार आहे.
या योजनेमधून शेतकरी बांधवांना एकरी ५०,००० रुपये अथवा हेक्टरी १. २५ लाख रुपये वार्षिक भाडे Annual Rent / ३ % वार्षिक वाढ देण्याचे नियोजित आहे.
या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्याची किमान ३ एकर जमीन महावितरण उपकेंद्र MSEDCL Substation पासून पाच किलोमीटरच्या आत असावी लागणार आहे. वीज उपकेंद्र पासून जवळ असणाऱ्या जमिनीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
भविष्यात क्रॉस सबसिडीची गरज कमी झाल्याने उद्योग व व्यवसायांना स्पर्धात्मक दराने वीजपुरवठा करण्याची संधी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या अभियानात उस्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना रुपये १५ लाख अनुदान Grampanchayat Grant राज्य शासनातर्फे मिळणार असून या द्वारे ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत.
अर्ज करण्यासाठी आणि कागदपत्रांच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
किंवा
अधिक माहितीसाठी संपर्क करा जवळचे महावितरण कार्यालय किंवा तलाठी कार्यालय.